केंद्रशासनाने सर्वच औषधांवर उत्पादन मूल्याच्या 30 टक्के अधिकतम दराने विकण्याचा कायदा करावा, अशी जनतेने मागणी करावी – पुरुषोत्तम सोमानी
Views: 258
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 58 Second
आरोग्य साहाय्य समितीचा ‘एक यशस्वी अभियान : औषधांच्या किमती कमी झाल्या !’ वेबीनार संपन्न !

पुणे: औषधाच्या विक्री मूल्यावर केंद्रशासानाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे औषधनिर्मिती आणि विक्री आस्थापनांचा देशभरात लाखो कोटी रुपयांचा महाघोटाळा चालू आहेऔषधनिर्मिती करणारी आस्थापने आणि औषधे विक्री करणारी आस्थापने 100 रुपये किमतीचे औषध मनमानी पद्धतीने हजार ते हजार रूपयांचे अधिकतम मूल्य (MRP) लावून विकत आहेतया लुटीमध्ये औषध निर्मिती करणार्‍या आस्थापनांसह (फार्मा कंपन्यांसहघाऊक औषध विक्रेते (होलसेलर), किरकोळ औषध विक्रेते (मेडिकल स्टोर), रूग्णालयेडॉक्टर्स आदींची मोठी साखळी आहेयाविरोधात आम्ही गेली चार वर्षे लढा देत आहेया लढ्याची दखल घेऊन पंतप्रधान मानरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात कर्करोगावरील (कॅन्सरवरील) 526 औषधांवर 30 टक्क्यांचा ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लावला आहे. (म्हणजे 100 रुपयांचे औषध हे अधिकतम 130 रुपयांना विकू शकतो.) त्यामुळे 36 लाख कर्करोग पीडित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहेत्यासह आता जीवनरक्षक औषधांसह (लाईफ सेव्हींग ड्रग्जसर्वच औषधांवर उत्पादन खर्चापेक्षा 30 टक्के अधिकतम दराने विकण्याची मर्यादा घालण्यासाठी सर्व जनतेने केंद्र सरकारकडे मागणी करावीअसे आवाहन तेलंगणा येथील उद्योगपती तथा ‘निजामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्रीपुरुषोत्तम सोमानी यांनी केले आहेते ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांच्या वतीने ‘एक यशस्वी अभियान औषधांच्या किमती कमी झाल्या !’ या विषयावर ‘वेबीनार’ आयोजित करण्यात आला होतात्यामध्ये ते बोलत होते.

    या वेळी ‘आरोग्य साहाय्य समिती’चे डॉमानसिंग शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन करतांना श्रीसोमानी यांच्याशी संवाद साधलाया वेळी महाराष्ट्रगोवाकर्नाटक आणि राजस्थान या राज्यांतील डॉक्टर तथा जिज्ञासू यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे श्रीसोमानी यांनी दिलीया वेळी श्रीसोमानी पुढे म्हणाले कीबहुतांश जनतेला हे माहिती नसते कीबाजारातील 97 टक्के औषधे ही जेनरीक आहेतती कोणीही उत्पादन करू शकतोत्यामुळे ती खूप स्वस्त असायला हवीतमात्र अनेक प्रसिद्ध औषधनिर्मिती आस्थापने ती औषधे स्वत:चे नाव टाकून 10 ते 20 पट अधिक दराने विकतातरुग्णालये तथा डॉक्टर हेही स्वत:च्या स्वार्थासाठी रुग्णांना औषधांचे घटक (सॉल्टलिहून देण्यापेक्षा अनेकदा ब्रँडेड (मोठ्या आस्थापनांचेऔषध लिहून देतातज्यात 10 ते 20 पट अधिक रक्कम लुटली जातेमुळात औषधाचे घटक लिहून दिल्यामुळे स्वस्त असणारी जेनरीक औषधे उपलब्ध होतातमला स्वत:ला हृदयरोगावर प्रत्येक महिन्याला 3,500 रुपयांची औषधे लागत होतीती आता 150 रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेततसेच जेनरीक औषधे ब्रँडेड औषधांप्रमाणेच परिणामकारकही असतातपण अनेक रुग्णांना भ्रम असतो की ब्रँडेड औषधे चांगली असतात.

      लोकांना स्वस्त आणि चांगली औषधे मिळावीत यासाठी काय करावेहे सांगतांना श्रीसोमानी म्हणाले कीआज भारतात 800 हून अधिक जेनरिक वा प्रधानमंत्री जनऔषधी दुकाने आहेतजिथे स्वस्त औषधे मिळताततर 10 लाखांहून अधिक अन्य औषधांची दुकाने आहेतजेथे अधिक किमतीने औषधे विकली जातातयावर केंद्रशासनाने सर्वच औषधांवर उत्पादन खर्चापेक्षा केवळ 30 टक्के अधिक दराने विक्री करण्याचा ट्रेड मार्जिन कॅप लावावीजेणेकरून कोणालाही अधिक दराने औषधे विकता येणार नाहीतसेच डॉक्टर तथा रुग्णालये यांना औषधे लिहून देतांना ब्रँडेड औषधे लिहून देण्यापेक्षा औषधांचे घटक (सॉल्टलिहून देणे बंधनकारक करावेजेणेकरून लोकांना स्वस्तातील जेनरीक औषधे सहज उपलब्ध होतीलयासाठी ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ने पुढाकार घ्यावाया मागणीची पूर्तता लवकरात लवकर होण्यासाठी जनतेने जिल्हाधिकारीतहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन शासनावर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहेअसेही श्रीसोमानी यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?