रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपी सहकारी बँकेवर कारवाई करत बँकिंग व्यवसायाचा परवाना केला रद्द; 22 सप्टेंबरपासून बँकेची सर्व सेवा बंद
Views: 217
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 53 Second

पुणे: पुण्यातील रुपी सहकारी बँकेला उद्यापासून टाळं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर कारवाई करत बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द केला आहे. उद्यापासून 22 सप्टेंबरपासून बँकेची सर्व सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 10 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले होते.

 

रुपी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले. बॅंकिंग नियमांचे पालन करण्यात बॅंक अपयशी ठरली असून बॅंक आपल्या ठेवीदारांसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास प्रतिकूल नाही असंही आरबीआयने म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत देऊ शकणार नाही असे आरबीआयने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयापर्यंतच्या आर्थिक मर्यादेपर्यंत प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींची ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असणार आहे. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 99 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे. 18 मे 2022 पर्यंत, DICGC ने बँकेच्या संबंधित ठेवीदारांचे तरतुदींनुसार एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 700 कोटी आधीच भरले आहेत.
येत्या 22 सप्टेंबर 2022 पासून रुपी बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिलेत. बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे असे आरबीआयने म्हटले. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?