लोकशाही मजबूत ठेवणे ही माध्यमांची जबाबदारी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
Views: 528
1 0

Share with:


Read Time:4 Minute, 38 Second

पुणे: पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एखादे मल्टिपल व्हिजन घेवून मीडिया हाऊस चालवणे हे खूपच जबाबदारीचे काम आहे पण सद्याची माध्यमे खरंच आपली जबाबदारी पार पाडत आहेत का ? असा मोठा प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला आहे. त्यासाठी सर्वप्रथम माध्यमांनी अधिकारांच्या किंवा सत्तेच्या दुरूपयोगाला थांबवण्याची गरज आहे,अशी अपेक्षा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

पुण्यातील आर्यन्स गृप ऑफ कंपनीजच्या नॅशनल चॅनल न्युज अनकट,मराठी सांस्कृतिक व मनोरंजन वाहिनी स्वरंग तसेच ओटीटी दुनियेच्या सॉल्ट पिक्च अशा तीन माध्यम समुहाच्या एकत्रित मिडिया हाऊसच्या कॉर्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ मुंबई – बंगलोर हायवेवर बावधन येथे आज १३ मे रोजी झाला. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ना.मुंडे माध्यमांसमोर बोलतांना पुढे म्हणाले की,सध्या माध्यमांचा वापर एक सत्ताकेंद्र किंवा अधिकार केंद्र म्हणून सर्रास केला जातो.कोणत्याही देशांत लोकशाही तेव्हाच बळकट होते, जेव्हा तिथली माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष असतात.काही निष्पक्ष माध्यमे प्रथेप्रमाणे आपल्या देशातही आहेत परंतु, पूर्वग्रहदूषितता आणि पक्षपातीपणाने त्यांनाही ग्रासले
असल्याची जाहीर टीका त्यांनी केली.दरम्यान,सद्याचा मिडिया कमकुवत झालेला दिसतो. म्हणूनच आजच्या माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची व लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी जागल्याची भूमिका प्रभावीरित्या पार पाडण्याची गरज आहे.त्यासाठी आर्यन्स मिडिया हाऊसने निःपक्ष पत्रकरिता करून लोकशाहीच्या चौथा स्तंभाला खरी आणि योग्य ओळख प्राप्त करून देण्याची गरज असल्याचे नमूद केले.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आर्यन्सचे अध्यक्ष मुकुंदराव जगताप यांनी प्रारंभी मंत्री ना.मुंडे यांचे स्वागत केले.सीईओ मनोहर जगताप यांनी मिडिया हाऊस सुरू करण्यामागील भूमिका नमूद केली.यावेळी कार्यकारी संचालिका सौ.स्मिता शितोळे जगताप,ओमा फोंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप,
एएसएमग्रुपचे संचालक डॉ.संदीप पाचपांडे ,अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,राकेश बांदल,लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सचिन बोंबले,ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे,एक्सर एनर्जीचे एम.डी.त्रिलोकनाथ यादव
यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

आर्यन्स ग्रुपचे संचालक संजय शेंडगे, निखिल शितोळे,मंजिरी हगवणे,सुरेश रानवडे, कामेश मोदी,वैशाली ननवरे,वैशाली वाळुंज, स्नेहा जगताप,गोरख पवार,नेहा जगताप,कैलास बागव,अशोक कांबळे,महेश रानवडे,संतोष गुजर,सुमित रानवडे,किरण लोहार,अमित रानवडे,ईश्वर वाघमारे,किरण कानडे या संचालकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गृपचे इव्हेंट हेड प्रवीण वानखेडे,निखिल जाधव, अविनाश उबाळे,प्रवीण कदम, विलास कोंढाळकर,सतिष पाटील,गुरुराज पोटे,संदीप राऊत यांनी परिश्रम घेतले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

20 thoughts on “लोकशाही मजबूत ठेवणे ही माध्यमांची जबाबदारी – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

  1. Se seu marido excluiu o histórico de bate – Papo, você também pode usar ferramentas de recuperação de dados para recuperar as mensagens excluídas. Aqui estão algumas ferramentas de recuperação de dados comumente usadas:

  2. … [Trackback]

    […] There you will find 9737 more Information on that Topic: marathi.reportertodaynews.com/it-is-the-responsibility-of-the-media-to-keep-democracy-strong-social-justice-minister-dhananjay-munde/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?